गडब / अवंतिका म्हात्रे
ग्रामपंचायत भागातील लोकांना मुबलक पाणी तसेच शुद्ध पाणी देणे ही ग्रामपंचायतीची नैतिक जबाबदारी असून या कामाला प्राधान्य देणे खूप आवश्यक असल्याचे अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले.
आगरदांडा ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगामधून सन २०२२-२३ ग्रामपंचायत स्तरमधून आरओ वॉटर फिल्टर सुमारे दोन लाख खर्च करून बसवण्यात आले आहे. याचे उद्घाटन
आ.महेंदशेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. १० रुपयांमध्ये ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना २० लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. यावेळी सरपंच वृषाली डोंगरीकर, उपसरपंच युसूफ अर्जबेगी, शांताराम हिलम, नम्रता हेदुलकर, नाहिदा डावरे, प्रीती भाटकर, भारती कांबळे, ग्रामसेवक सुशांत ठाकूर, माजी पाणी पुरवठा सभापती पांडुरंग आरेकर, तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, जिल्हा संघटिका शुभांगी करडे, जिल्हा उपप्रमुख भारत बेलोसे आदी मान्यवर उपस्थित होते.


