गडब/सुरेश म्हात्रे
⬛लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप निश्चित झाले नसले तरी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जागा वाटपाचे गणित कसे असेल याचे संकेत दिले आहेत. नैसर्गिक न्याीयानुसार ज्याठ मतदार संघात ज्याी पक्षाचा खासदार आहे त्यास ठिकाणी त्याचि पक्षाचा खासदार निवडून आला असेल त्यााच पक्षाचा दावा राहील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पीष्ट केले आहे.
अलिबाग येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप आणि मित्रपक्षांची समन्वय समिती आहे, आपण त्या समन्वय समितीमध्ये आहोत. त्याषमुळे मी यावर अधिकारवाणीने बोलू शकतो. तिकिट वाटप हे आमच्याही हातामध्ये नाही. तसेच इतर पक्षाबाबतही तीच परिस्थिती आहे. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे नेते, शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली तिकिट वाटप होईल. सध्या ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा खासदार आहे, त्याच तो निवडणूक लढवेल, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे आपले मत आहे. मात्र प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे. तरीही याबाबत काय निर्णय घ्यायचा असेल तर तीनही पक्षाने नेते निर्णय घेतील, असे सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
रायगड
राष्ट्रवादीच्या मदतीला शिवसेना
मतदार संघावरून भाजप आणि राष्ट्र वादी काँग्रेसमध्ये सध्या धुसफुस सुरू आहे. राष्ट्रोवादीचे सुनील तटकरे विद्यमान खासदार असताना भाजपने या मतदार संघावर दावा
रायगड लोकसभा सांगितला आहे. त्याटसाठी विशेष मोहीम राबवली जात असून सुनील तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे. आता राष्ट्र वादीच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याध पाठोपाठ उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही राष्ट्रआवादीची बाजू घेतली आहे. याबाबत उदय सामंत यांना विचारले असता राष्ट्र वादी काँग्रेसचा इथं खासदार असल्याटमुळे नैसर्गिक न्या. याने त्यां चाच दावा योग्यत असल्याटचे त्यीनी स्पष्ट केले.