Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

जेवढा बॅलन्स, तेवढीच**वीज! राज्यात**लवकरच बसविणार स्मार्ट मीटर*

Responsive Ad Here
               *गडब/ अवंतिका म्हात्रे*       

🔰स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल आणि मात्र, ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हे सुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होणार आहे.
घर बसल्या मोबाइलवरून ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे आणि ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाइलवर मेसेज पाठविण्याची व्यवस्था आहे. एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीजपुरवठा बंद होणार नाही तसेच सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीजपुरवठा चालू राहील.वीज ग्राहकांना त्यांच्या
मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून आणि काही महिन्यांत हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होणार आहेत.
महावितरणच्या २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार आहेत आणि त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. मीटर बसविल्यावर ग्राहक मोबाइल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येणार आहे. विजेसाठी किती खर्च करायचा हे निश्चित करता येईल आणि किती वीज वापरली याची माहिती मोबाइलवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा, हेसुद्धा ग्राहकांना समजणार आहे.