गडब/सुरेश म्हात्रे
रुचकर आणि चविष्ट मसाले बनवून मिळविण्यासाठी कर्जत आणि नेरळच्या बाजारपेठेत मिळणारी मिरची महत्त्वाची भूमिका बजावत असते. हैद्राबादची स्पेशल मिरची मिळणारी एकमेव बाजारपेठ म्हणून कर्जत येथील बाजारपेठ गृहिणींच्या गर्दीने फुलली आहे. महागाईच्या जमान्यात दुकाने कमी झाली असली तरी आवक
मात्र तेवढीच आहे. त्यामुळे मिरचीचा ठसका जेवणाच्या मसाल्यात हवा तर मिरची गल्लीत जायलाच हवे. पण, यावर्षी महागाईमुळे मिरचीचा ठसका गृहिणींचा खिसा खाली करणारा नक्कीच आहे.
महाराष्ट्रातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ कर्जतच्या मिरची बाजारपेठेची ओळख आहे. ही मिरची प्रामुख्याने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि
कर्नाटक राज्यातून येते. मिरची खरेदीसाठी मुंबईसह बदलापूर, डोंबिवली, कल्याण, पनवेल, ठाणे या भागातील आगरी- कोळी लोक मच्छी मटण या पदार्थांची लज्जत वाढविणारे मसाले बनविण्यासाठी कर्जतच्या बाजारपेठमध्ये येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या खरेदी करण्यासाठी जानेवारीपासून गर्दी करू लागले आहेत. तिखट मिरचीसोबत मसाल्याचे पदार्थ
⭕मिरच्यांचे दर⭕
कंटूर-३००
लवंगी-३००
काश्मिरी-८००
बेडगी-७००
शंकेश्वरी-४४०
त्यात हळद, गरम मसाले यांची खरेदी मोठ्या प्रमाणात कर्जत शहरातील महावीर पेठेतील दुकानांमधून सुरू आहे.
*यंदा मिरची गेल्या वर्षीपेक्षा महाग झाली आहे हे खरे असले तरी महागाई, तसेच वाढते दर यांचा कोणताही परिणाम मिरची विक्रीवर झालेला दिसून येत नाही. या क्षेत्रात रमणलाल शहा, बाबुलाल भानाजी गुप्ता, किराणा शांतीलाल सरदारमल हे मोठे व्यावसायिक समजले जातात. तर सर्वाधिक खप कंटूर, लवंगी, बेडगी आणि काश्मिरी यांचा आहे. - जयंतीलाल जोहारमल परमार, मिरचीचे जुने विक्रेते*
*⭕कसा करतात मसाला?*
*खरेदी केलेल्या मिरचीची सुकलेली देठ काढून मिरची कडक उन्हात सुकवली जाते. त्यानंतर त्यात हळद, गरम मसाले यांचे योग्य मिश्रण करून या सर्व वस्तू मिरची कांडपमध्ये मसाला तयार करण्यासाठी नेल्या जातात. तेथे कांडप गिरणीत तयार झालेला मसाला गृहिणी या डब्बे भरून ठेवतात. हा मसाला वर्षभर टिकतो, तर बाजारात मिळणारे तिखट मसाल्याच्या पाकिटात केवळ मिरची पूड असते. त्यामुळे मिरची खरेदी करून कांडप केंद्र शोधून मसाले तयार करण्यासाठी महिला धडपड करीत असतात.*